TOD Marathi

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environmental Minister Aditya Thackeray )  यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ( Ayodhya Daura ) सदभाऊ खोत यांनी खोचक टोला लगावला आहे. रामाकडे जावा नाही, तर काशीत अंघोळ करा, राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही संपला आहात असा खोचक टोला सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी शिवसेनेला ( Shivsena ) लगावला.

सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे, पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात. आज ते अयोध्येच्या स्वारीवर गेले आहेत. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला, ज्यांनी राम मंदिर बांधायची यांच्यात हिम्मत नाही असे म्हणाले तेच आता आयोध्येला निघाले आहेत.

रामाचाही जप करायचा आहे आणि कॉंग्रेस वगैरे आहेत त्यांना हिरवे झेंडे खांद्यावर घेऊन नाचायचे आहेत. एका म्यानात दोन तलवारी राहतील कश्या? आता त्या राहू शकत नाहीत. मग तुम्ही रामाला जावा नाहीतर काशीला जाऊन आंघोळ करा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून तुम्ही संपलेले आहात, असा टोला लगावला.